A new AI capability that delivers analysis-ready Media Intelligence. More than just a product launch, this is a shift in how communications teams monitor, understand and act on media coverage.
Deshdoot (Marathi देशदूत – messenger of the country) is an Indian daily newspaper, published in the Marathi language in the northern part of Maharashtra state. It is headquartered in Nashik.
Deshdoot is the fastest growing Marathi newspaper in India. Source
मुंबई | Mumbai मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते खचणे, झाडे कोसळणे यांसारख्या दुर्घटना समोर येत आहेत. दरम्यान, मुंबईतील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी (MMR) ‘ऑरेंज अलर्ट’ बदलून आता ‘रेड अलर्ट’ (अतिवृष्टीचा इशारा) जारी केला आहे. या काळात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई | Mumbai गेल्या सहा दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध भागांत भीषण दुर्घटना घडल्या आहेत. मुंबईत (Mumbai) आतापर्यंत वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. चेंबूर, कुर्ला आणि मानखुर्द या भागांना पावसाचा मोठा फटका बसला असून, मानखुर्द येथे रविवार (दि.०५) रोजी एक दुर्दैवी घटना घडली आहे.
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल सायंकाळी 3608 दलघफू झाला होता. वाढलेला पाऊस आणि होणारी आवक लक्षात घेता धरणातील पाणीसाठा आज 4000 दलघफूच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे. भंडारदर्यात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 265 दलघफू पाण्याची आवक झाली. काल दिवसभरात 109 दलघफू पाणी दाखल झाले.
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ शिवारात शनिवारी (4 जुलै) मध्यरात्री पुणे ग्रामीण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहिल्यानगर व नाशिक पथकाने संयुक्त धाड टाकत सुमारे एक लाख रूपये किमतीच्या 25 गोण्या संशयास्पद डेअरी पावडरचा साठा जप्त करून सीलबंद केला. संबंधित व्यक्तीकडे साठवणुकीचा परवाना नसल्याचे तसेच पावडरच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कोणतीही बिले अथवा कागदपत्रे उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.
शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shani Shingnapur श्री शनैश्वर देवस्थान मधील कथित गैरव्यवहाराच्या (अॅप घोटाळा) चौकशी संदर्भातील 8 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते सचिन दरंदले यांनी दिली. घोटाळेबाजांवर कारवाई कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी याचिकाकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांना वैयक्तिक सुनावणीची संधी देण्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar लेखापरीक्षणात नमूद करण्यात आलेल्या 15 कोटी रुपयांच्या तफावतीच्या मुद्द्यावरून माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत रविवारी पुन्हा जोरदार खडाजंगी झाली. यावेळी माईकवर बोलण्यावरून वाद निर्माण झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नेत्यांसह संचालकमध्ये शाब्दिक चकमकीच्या फेरी झाल्या. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना व्यासपीठावर जावे लागले. त्यामुळे काही सभासदांनी आक्षेप घेतला. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर सभा सुरळीत पार पडली.
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी फाटा येथील हॉटेल रंगीला पंजाब फॅमिली रेस्टॉरंटचा अन्न व्यवसाय परवाना अन्न व औषध प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता आढळल्याने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन लक्षात घेऊन जनहित आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल तपासणीच्या सुचना केल्या आहेत.
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जुगार व अवैध दारू व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रविवारी (5 जुलै) धडक कारवाई करत नेवासा, अहिल्यानगर तालुका, राहाता आणि लोणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकाच दिवशी पाच ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून 33 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच 6 लाख 59 हजार 5 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अहिल्यानगर | Ahilyanagar रिमझिम कोसळणार्या पाऊस धारा, मधेच ढगांच्या चादरीला बाजूला सारून डोकावणारा रविराज, अंगात हुडहुडी भरवणारा थंडगार वारा, डोंगरदर्यांना वेढणारे दाट धुके आणि त्या धुक्याच्या चादरीत क्षणाक्षणाला लपणारा-उगवणारा ऐतिहासिक चांदबीबी महाल… निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या या मनमोहक दृश्यांचा अनुभव सध्या शहा डोंगरावर येणार्या प्रत्येक पर्यटकाला मिळत आहे. त्यामुळे चांदबीबी महाल हा पावसाळी निसर्गप्रेमींसाठी ‘दि बेस्ट रेन डेस्टिनेशन’ ठरत आहे.
पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegaon Phata महाराष्ट्रातील शेतकर्यांसमोर अधिक अडचणी असताना आता अजून नव्याने खरीप हंगामातील पिकांसाठी शासनाच्या माध्यमातून संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकरी हिश्श्यामध्ये वाढ करून शेतकर्यांना आर्थिक फटका दिला आहे. सदर योजना ही निवडणुकीच्या वर्षात एक रुपयामध्ये सुरू ठेवल्याने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर पूर्वीप्रमाणे शेतकरी हिस्सा घेण्याचा शासन निर्णय झाला.